Posts

सुशांत आणि आई

Image
सुशांत सिंगराजपूत गेला, स्वतःला संपवलं त्याने.. ज्या गळ्यात सेल्फी साठी सत्करासाठी हार फुल पडत होते त्याच गळ्यात आज सुशांतने फासाचा दोर टाकला, आणि एका क्षणात संपला. जे कारकिर्द उभं करण्यासाठी त्याने शेकडो किलोमीटर दूर येऊन खान-कपूरांच्या भाऊगर्दीत स्वतःची ओळख तयार केली. आज एका क्षणात ती सगळी ओळख संपली आता सुशांत फक्त आठवणीत राहील.. आणि पुढची पिढी कौन सुशांत? असा प्रश्न जरूर विचारेल.  सुशांतच्या मृत्यू नंतर तो मानसिक तणावाखाली होता असं सांगितलं जातंय. अगदी मी मुद्यावर येतो, म्हणजे त्याने काही दिवसांपूर्वी आपल्या आई ला उद्देशून एक पोस्ट टाकली होती त्यामध्ये त्याने लिहिलं होतं जीवन क्षणभंगुर आहे. या मानसिक तणाव मध्ये त्याला त्याची आई आठवली. आज ती माऊली असती तर त्याने कदाचित असं केलं नसतं.  आई जवळ गेला असता तिच्या कुशीत शिरून काही बोलला असता.. मन मोकळे करून रडला असता.. हसला असता.. खेळला असता बागडला असता, हट्ट पुरवून घेतले असते, रुसला असता, रागावला असता, काही तरी केलं असतं पण स्वतःला संपवलं नसतं.  आज सुशांत कडे सगळं होतं पण आई नव्हती.. आणि त्याच नसलेल्या आईची त्याल...

मोदींची मिठी डोळ्यात खुपणाऱ्यांसाठी एक खुलं पत्र

Image
मी मोदी भक्त नाही. तरीही मोदींनी इस्रो प्रमुखांना जवळ घेऊन मारलेली मिठी अनेकांना खुपली त्यावर काहीनी जावईशोध लावले. वर इस्रोच्या प्रमुखांना हे शोभत नाही, पदाला साजेसं राहावं अशा शहाणपणाचे डोस अनेकांनी फेसबुकवरुन त्यांना पाजले.  त्याही उप्पर जाऊन अमेरीकेत मोहिमा अयशस्वी झाल्यावर नासा प्रमुख रडत नाही अशी थुकरट उदाहरण ही देऊन झाली  आणि अनेक अंधळ्या मोदी द्वेषींनी हेच सडके विचार सरसकट शेअर केले.     मोदींच्या धोरणांना, विचारधारेला विरोध करणं हे सशक्त लोकशाहीच्या जिवीताचं लक्षण आहे पण म्हणून सरसकट उचलली जीभ लावली टाळ्याला असं करुन स्वताचं हसं करुन घेण्यात कसली आली धन्यता?     मोदी इस्रोच्या कार्यालयात मोदी कुटुंबियांचे किंवा भाजपचे प्रतिनिधी म्हणून गेले नव्हते. ते देशवासियांचे प्रतिनिधी म्हणून गेले होते हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मोहिम अयशस्वी झाल्यानंतर आपण सगळे हिरमुसलो पण प्रत्येकाला त्या शास्त्रज्ञांबद्दल अभिमान वाटला, मला सांगा कोणाला अभिमान नाही वाटला?  मग जर मोदींनी तिथे जाऊन त्यांना मिठी मारली, त्यांचे अश्रु पुसले, त्यांना धीर दिला तर तर काय...

IPL सोबतच माझी ही मॅच..

Image
  मॅचची अशीही आठवण... (दोन्ही जर्सी सोबत एकाच स्टूडिओत) अत्यंत अटीतटीच्या आणि शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत   मुंबई इंडियन्सने   चेन्नई सुपर किंग्सवर अवघ्या एका धावेने मात करत चौथ्यांदा आयपीएलच्या विजेतेपदावर कब्जा केला , ही मॅच जशी तुमच्यासाठी उत्कंठावर्धक ठरली तशीच माझ्यासाठी देखिल एक अनोखा अनुभव देणारी ठरली, तसा लहानपणापासून माझा आणि क्रिकेटचा दूरदूरवर संबंध नाही, आणि भारत-पाक सोडून मी मॅच सहसा पाहत नाहीच. त्यामुळे मॅच मध्ये स्ट्रोक, खेळी, शॉट्स याबद्दल मला फारच किमान ज्ञान. आणि म्हणूनच आयपीएलच्या १२ व्या सिजनची फायनल मॅच माझ्यासाठी वेगळी ठरली, ऑफीसमध्ये पोहचेपर्यंत आज फायनल आहे याबाबत माहितच नव्हतं, ऑफीस डेस्कवर चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्सची जर्सी पाहिल्यावर लक्षात आलं आज आपल्याला यावरच बातम्या द्यायच्या आहेत, बऱ्याचदा आम्ही विशेष विषयांच्या बातम्या देत असतांना तसाच गेटअप करत असतो. वेषभूषा ही संबंधित बातमीशी साधर्म्य असणारी असावी असा किमान प्रयत्न असतो, म्हणून  IPL  मॅचवर आधारीत पहिलं बुलेटीन सहकारी वैभव कुलकर्णीनीं घेतल...

पार्थ नावाचा नवा स्पार्क

Image
#स्नेहिल_बाण #स्नेहिल_म्हणे पार्थ पवार नावाच्या त्रिकोणाची तिसरी बाजू आज हा लेख वाचत असतांना पार्थ पवारवरच का लेख लिहावासा वाटला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याला उत्तर हे आहे की, पार्थ पवार हा राजकारणात आलेला खऱ्या अर्थाने युवा चेहरा. तसा पार्थ काही पहिला नाही यंदा सुजय विखे, रणजित सिंह आणि पार्थ यांच्या सक्रिय राजकारणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची चर्चा झाली. सुजय विखे आणि रणजित सिंह हे याधीच राजकारणात सक्रीय होते म्हणून त्यांच्याबद्दल मला लिहावसं वाटलं नाही त्यातुलनेत पार्थची पाटी तशी कोरीच म्हणून हा लेख लिहीतोय, हा लेख लिहायला मला राष्ट्रवादीच्या कुठल्याच नेत्याने किंवा पक्षाने सांगितलं नाही. परंतु गेल्या काही दिवसांपूर्वीच्या घडामोडी पाहता पार्थ सारख्या तरुण उमेदवारासाठी लिहावं असं जरुर वाटलं. म्हणून लिहीतोय. एका राजकीय पुढाऱ्याचा मुलगा राजकारणात आला तर त्यात वेगळं ते काय? ते होणारच होतं.. कधी ना कधी तो राजकारणात येणारच होता.. किंवा कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्याच उचलायच्या का? असे अनेक प्रश्न आणि दावे उपस्थित झाले. खुद्द पार्थच्या आजोबांनी ...

“आम”च भुत…!!!

“ आम ” च भुत… !!!                राजकारणाला अरविंद केजरीवाल नावाच्या भुताने झपाटले. दिल्लीच्या तख्तावर असणारी कॉग्रेसची सत्ता या भुताने गिळुन टाकली असे ऐकिवात आहे. ऐकीवातच नाही हो खरंच आहे. बसायला व्हॉल्वोची बस कमी पडणाऱ्या दिल्लीतील कॉग्रेस आमदारांची संख्या आज एक इनोव्हात पुरुन उरेल इतकीच ठेवली या “ आम ” च्या भुताने.  हे भुत म्हणतयं मी “ आम आदमी ” आहे. पण कालच आलेल्या बातमीत असं कळतयं की या भुताला रहायला ९ खोल्यांचा फ्लॅट लागतोय.. अबब खरंच आहे की नाही भुत... असो                सध्या आपण वाचत आहात ते आम आदमीच्या भुताची कहाणी या भुताची भिती इतकी झाली की, दिल्ली सकट संपुर्ण भारताच्या राजकारणात ‘ आम आदमी ’ च्या भुताची हवा आली. अगदी महाराष्ट्रात सुद्धा या भुताची भिती वाऱ्यासारखी पसरली. ‘ रामन राघव ’ पुन्हा आला हो. पुर्वी ‘ रामन राघव ’ हा फुलपाखरांच्या रुपात येऊन मारुन जायचा. पण अरविंद केजरीवाल हा साध्या वेषात येऊन मारत नसुन संपवुन जातोय. श्रद्ध...

मारुनच टाका पोलिसानां.....!!!

Image
मारुनच टाका पोलिसानां..... !!!                 संतश्री सदगुरु विश्वात्मा महात्मा स्वर्गीय. लख्खनभैय्याजी यांचा एन्काउंटर केल्या मुळे आपल्या पोलिसदलातील पोलिसानां फाशीची शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकीलांनी केलीय असं वाचण्यात आलं. मी तर म्हणतो देताच कशाला या पोलिसानां शस्त्र. सर्वात सोप्पा पर्याय पोलिस खातेच बरखास्त करा आणि स्व.शाहिद आझमी सारखे किंवा मझिद मेमन सारखे नाही तर स्व.लख्खन भैय्या सारख्या ह्यात असणाऱ्या समाजसुधारकानांच सांगा आता आमचे संरक्षण करायला. उगीच नसता भार सरकारच्या डोक्यावर कशाला ? आता कार्यरत असणाऱ्या पोलिसानां सांगा या सारख्याच्यां हाता खाली काम करा. कारण 12 – 12 तास काम करण्याची पोलिसानांच सवय आहे ना.. म्हणुन... !!                  नुकतीच सरकारी वकीलांनी मागणी केलीय की, लख्खनभैय्या एनकाऊन्टंर प्रकरणी पोलिसानां फासावर लटकवा. मी तर अशी मागणी करतो की, ज्या सरकारी वकिलानीं अशी सुयोग्य मागणी केली त्याच्य...

किती दिवस सहन करायचा बंद??

Image
किती दिवस सहन करायचा बंद??                       आज काल जो तो उठतो संप करतो. साला , आमच्या जिवावर जगतात आणि आम्हालाच वेठीस धरतात ? आमच्या वर राज्य करणारे पुळचट सरकार नुसत्याच पोकळ धमक्या देणारं. किती दिवस चालणारं हे सगळं ? किती सहन करायचं आम्ही ? कोणी दिशा देणारं नाही ? कोणी समजुतदार नाही ? मग काय होणार काय ? जो तो उठतो बंद करतो. त्रास आम्हाला होतो . सरकारशीं नपटलेला सौदा बंदच हत्यार उपसुन पुर्ण केला जातो. लोकशाही मार्गात जरी बंदच्या काहीही व्याख्या असल्या तरी नागरीकानां त्रास देणारे हे बंद कायमचे बंदच व्हायला पाहिजे. आता काय तर म्हणे , एलबीटी जाचक आहे म्हणुन बेमुदत संप.... !!! या बंदात सहभागी होणारे एक एक दुकान फोडलेच पाहीजे. आज तर औषध विक्रेत्यांचांही बंद. उद्याच्या पेपरात १०० खात्रीने मी सांगतो. औषधं वेळेवर न मिळाल्याने मृत पावलेल्या एखाद्या महाराष्ट्रीय नागरीकांची बातमी आपल्या वाचनात येणार.             ...

हा काय, जागतिक महिला दिन..???

Image
हा काय , जागतिक महिला दिन.. ???       आज काय जागतिक महिला दिन. सर्वत्र नारी शक्तीचा जयजयकार. प्रत्येकाच्या फेसबुकच्या वॉलवर महिलानां शुभेच्छांचे आकर्षक ग्राफिक्स.राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याच्यां वॉलवर आपल्या नेत्यांची आणि त्यांच्या पत्नीचे छायचित्र. स्त्रीशक्तीचा जागर आणि महिलांबद्दलचा आदर इत्यादी. गेल्या अनेक वर्षापासुन आपण हेच करतोय. गेल्या अनेक वर्षापासुन माझे फेसबुकचे खाते कार्यान्वित आहे. दर वर्षी महिलांचे प्रेम जागतिक महिला दिनांच्या दिवशी आणि मातृदिनांच्या दिवशीच उफाळुन येते. एखाद्या व्यक्तीचा आवडलेला ग्राफिक्स लगचेच शेअर करायचा किंवा स्वताः अपलोड करुन आपल्या वॉलवर टाकायचा इतकेच.         मदर तेरेसा, इंदिरा गांधी, कल्पना चावला, सावित्रीबाई फुले, लता मंगेशकर याच दशकातील एखाद्या महिलांचे छायचित्र टाकायचे आणि आपला महिला दिन साजरा करायचा. मागच्या वर्षी सुद्धा हाच सुळसुळाट होता. हाच भंपकपणा होता. पण गेल्या 365 दिवसात काय झाले. या छायचित्रांत बद्दल झाला ? नाही . तेच छायचित्र त्याच शिळ्या चारोळ्या आणि त्याच काव...