Posts

Showing posts from November, 2012

नितीमुल्यांवर नाचणारी पत्रकारीता...

Image
नितीमुल्यांवर नाचणारी पत्रकारीता...                    बाळासाहेबानां जाऊन फक्त काही तासांचा अवधी लोटला असतानां इलेक्ट्रोनिक माध्यमांनी चर्चेला व बातमीला बनवलेला हा स्मारकाचा विषय हा टीआरपीसाठी केला जाणारा धंदाच आहे. नुकत्याच काही दिवसांपुर्वी बाळासाहेबांचे दिर्घ आजाराने निधन झाले. बाळासाहेब महापुरुष होते यात वाद नाही परंतु त्यांच्या स्मारकाची घाई लक्षात घेता आज नाही तर कधीच नाही अशी जणु भितीच या माध्यमांना वाटत असल्याचे जाणवते. बाळासाहेबांचे स्मारक शिवाजीपार्क वर व्हावे ही इच्छा मनोहर जोशीनीं बाळासाहेबांच्या अस्थी गोळा करायला गेल्यावर माध्यमांसमोर बोलावुन दाखवली. आता जोशीचे आणि बाळासाहेबांचे संबंध कसे होते हे आपल्याला माहितीच आहे त्यामुळे या संबंधातुन अशीच मागणी जोशी करतील हे सुद्धा अपेक्षितच होते. पण त्यांनी ही मागणी इतक्या लवकर करायला नको होती कारण बाळासाहेबांच्या चित्तेचा अग्नी विझतो न विझतोच महाराष्ट्रातील माध्यमांमध्ये जोशीच्या या मागणी ...

माध्यमांची घसरलेली नितीमुल्य.

माध्यमांची घसरलेली नितीमुल्य.                                     पुर्वी दर्पन, केसरी सारख्या वर्तमानपत्रांनी समाजाला दिशा देण्याचे कार्य करत भारतीय स्वातत्र्यांच्या लढ्यात आपला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहभाग नोदंवला. मराठा,तरुण भारत सारख्या वर्तमानपत्रानी संयुक्त महारष्ट्राचा लढा लढवला या सारख्या वर्तमानपत्रानीं व माध्यमांने समाजाला आणि समुहाला दिशा देण्याचे पवित्र कार्य केले. पण आजचे वृत्तपत्रांनी व माध्यमांनी समाजाला दिशा देण्याऐवजी समाजाची दशा करुन ठेवली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण आज माध्यमांचे स्वरुप बदलले आहे. माध्यमांची कार्यालये कॉर्पोरेट झाली असुन व्यवस्थापनाचा अभ्यास केलेल्या तरुणांच्या हाती लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची कॉलर आवळल्या गेली आहे. बातमी ही आता टीआरपीसाठी चालवली जाते. प्रत्येक वृत्तपत्र त्या वृत्तपत्राने ठरवलेल्या अजेड्यांनुसार काम करत आहे. आपला अंजेडा लोकांवर लादण्यासाठी इतिहासातील ...

इंटरनेटवरील श्रद्धांजली...

Image
इंटरनेटवरील श्रद्धांजली...              वातानुकुलीत कार्यालयात किंवा घरी बसुन इंटरनेटच्या माध्यमांतुन सोशल नेटवर्कींग साईट्स वर जर बाळासाहेबानां श्रद्धांजली वाहायची असल्यास किंवा त्यांच्या प्रती आदर, प्रेम, सन्मान, आणि त्यांचा अभिमान बाळगावयचा असेल तर प्रत्येकाने आपल्या सोशल नेटवर्कींग साईटस् म्हणजे सर्वात लोकप्रिय अशा फेसबुक, ट्विटर, ऑरकुट, गुगल, याहू, जीमेल, ईस्केप सारख्या अकाउन्ट वरील प्रोफाईल फोटो हा मा. बाळासाहेबांचाच ठेवावा. किमान आतापर्यत नाही तर येणाऱ्या १३ दिवसांपर्यत तरी.          कारण, आपल्या संस्कृतीनुसार एखादी प्रिय व्यक्ती स्वर्गवासी झाल्यावर त्या व्यक्तीच्या स्वर्गवासाच्या शोकाने आपण येणारे १३ दिवस हे त्या व्यक्तीच्या शोकात अर्पित असतो. हा शोक व बाळासाहेबांप्रती आदर व्यक्त करण्याची वेळ आज आली आहे. त्यानुसार माझे महाराष्ट्रातील प्रत्येक बाळासाहेबांचा आदर करणाऱ्या व्यक्तीला अशी आग्रहाची विनंती आहे की त्यांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी आपले प्रोफाईल फोटो हे बाळासाहेबा...

शिवाजी पार्क बाळासाहेबांचेच...

Image
शिवाजी पार्क बाळासाहेबांचेच...                                   बाळासाहेब गेल्या ५ दशकाचे वादळ सतरा तारखेला सतराच्या खतऱ्यात सापडले.. बाळासाहेब ठाकरे या ९ अक्षरांशिवाय महाराष्ट्राचा इतिहास काही केल्या पुर्ण होऊ शकत नाही हे एकमेव सत्य ! बाळासाहेबांच्या जाण्याने काय पोकळी निर्माण झाली ते त्यांच्यावर व त्यांच्या विचारांचा आदर करणाऱ्या व्यक्तीला कळु शकेल. असे हे बाळासाहेब कोण होते ? काय होते ? हे आपल्या सगळ्यानांच माहित ीये . बाळासाहेब ठाकरे हे नाव माहित नसणारे व्यक्ती महाराष्ट्रात हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच असाव्यात. अशा या बाळासाहेबांच्या प्रत्येक सुखा दुखांचे साक्षीदार असलेले त्यांचे शिवाजी पार्क म्हणजे शिवसेनेचे, शिवसैनिकांचे आणि खुद्द बाळासाहेबांचे एकाप्रकारचे माहेरच. बाळासाहेब हे शिवसेना, शिवसैनिक आणि शिवाजीपार्क या शब्दांविना अपुरेच. यापैकी कोण्याएका शब्दाचा अभ्यास करायचा झाला तरी या उरलेल्या शब्दांविना तो ...