किती दिवस सहन करायचा बंद??
किती दिवस सहन करायचा बंद?? आज काल जो तो उठतो संप करतो. साला , आमच्या जिवावर जगतात आणि आम्हालाच वेठीस धरतात ? आमच्या वर राज्य करणारे पुळचट सरकार नुसत्याच पोकळ धमक्या देणारं. किती दिवस चालणारं हे सगळं ? किती सहन करायचं आम्ही ? कोणी दिशा देणारं नाही ? कोणी समजुतदार नाही ? मग काय होणार काय ? जो तो उठतो बंद करतो. त्रास आम्हाला होतो . सरकारशीं नपटलेला सौदा बंदच हत्यार उपसुन पुर्ण केला जातो. लोकशाही मार्गात जरी बंदच्या काहीही व्याख्या असल्या तरी नागरीकानां त्रास देणारे हे बंद कायमचे बंदच व्हायला पाहिजे. आता काय तर म्हणे , एलबीटी जाचक आहे म्हणुन बेमुदत संप.... !!! या बंदात सहभागी होणारे एक एक दुकान फोडलेच पाहीजे. आज तर औषध विक्रेत्यांचांही बंद. उद्याच्या पेपरात १०० खात्रीने मी सांगतो. औषधं वेळेवर न मिळाल्याने मृत पावलेल्या एखाद्या महाराष्ट्रीय नागरीकांची बातमी आपल्या वाचनात येणार. ...