Posts

म्हणे गणपती बाप्पा मोरया....

Image
म्हणे ग ण प ती बा प्पा मो र या .... ग णेशोत्सवाची धामधूम सुरू झाली की अनेक वेळा सर्वसामान्यांच्या काळजात धस्स होते ते वर्गणी नामक जाचामुळे. अनेक मंडळे आणि त्यांच्या वर्गण्या देता देता सर्वसामान्य मेटाकुटीला येतात. एक तर गणेशोत्सवाची वर्गणी देऊन ती सत्कारणी लागण्याचे पुण्य कमवायचीही सोय राहिलेली नाही. गोळा केलेला हा पैसा ही सार्वजनिक मंडळे नेमका कशावर कसा खर्च करतात , याचा हिशेब पाहण्याची कोणतीच सोय आपल्याकडे नाही. गणेशोत्सवात हाती येणार्या पैशाचा समाजोपयोगी कामासाठी विनियोग केला तर ?                 1893 मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली तेव्हा त्यांचा हेतू होता स्वातंत्र्यासाठी राष्ट्रजागृती करणे. त्यांच्या काळात त्यांनीच सुरू केलेल्या गणेशोत्सव आणि शिवजयंतीसारख्या उत्सवांचे उद्दीष्ट पार पडले. स्वातंत्र्य मिळाल्यावरही हे दोन्ही उत्सव अतिशय थाटात साजरे केले जातात. स्वातंत्र्यानंतरच्या सुरूवातीच्या आणि नंतरच्या काळातही सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे सा...

मुंबईतील मुजोर रिक्क्षाचालक

Image
आवरा या मुजोर रिक्क्षावाल्यानां...        माज आणि मस्ती बघायची असेल तर ती पहावी मुंबईच्या रस्तावर आपल्याच गुर्मीत धावणाऱ्या रिक्क्षाचालकांची. त्यानां ना वृद्धमंडळी दिसत ना गरोदर स्त्रीयां, ना महिला, ना आजारी माणसे, ना लहान मुले थेट झिडकारत निघुन जातात. यानां वठणीवर आणण्यासाठी कृपया प्रशासनाने लवकरात लवकर काही तरी दखल घेतली पाहिजे. खरचं आज मुंबईकर मोठ्या त्रासातुन जात आहेत यानां वेळीच आवर घालणे फार गरजेचे आहे या व्यवसायात आज मोठ्या प्रमाणात परप्रांतिय घुसले परवाण्यासाठी आठ – आठ हजार मोजुन त्यांनी मुंबईच्या रिक्क्षांचा ताबा मिळवला आणि यानां भाड्याने रिक्क्षा उपलब्ध करुन देणारे रिक्क्षाचे खरे मालक मोठ्या प्रमाणात मराठीच आहेत घरी बसुन ८ तासावर रिक्क्षा या भैय्यानां भाड्याने उपल्बध करुन देणारे हे महाशय घरी बसुन दिवसाला रिक्क्षाच्या भाड्याचे ६०० रुपये एका दिवसाला कमावतात.. आज प्रत्येक व्यवसायात सगळेच वाईट आहेत आहे असे नाही पण या रिक्क्षाचालकांमध्ये सज्जन रिक्क्षांचालकांची संख्य़ा हातावरच्या बोटावर मोजण्याइतकीच राहिली आहे.     सुट्टया पैश...

मिल्क मॅन ऑफ इंडीयाला मानाचा मुजरा...

Image
अमुल चे प्रणते वर्गीस कुरीयन . वर्गीस कुरीयन याचा जन्म २६ नोव्हेंबर १९२१ साली केरळातील कलिकत या खेड्यातील एका मध्यमवर्गीय सिरीयन ख्रिश्चन कुटुंबात झाला. त्यांचे पिता पुथेनपरक्कल कुरीयन हे कोची मधील विख्यात शल्यविशारद होते तर आई उच्चविद्याविभुषित होती. भारतीयानां शिक्षित करण्याच्या ब्रिटीश सरकारच्या धोरणांचा पुरेपुर उपयोग कुरीयन कुटुंबाने करुन घेतला. सुरवातीला त्यानां लष्करात जावयाचे होते पण आईच्या विरोधामुळे त्यांनी मद्रास मधील लॉएला महाविद्यालयातुन १९४० महाविद्यालयीन शिक्षण शास्त्र शाखेतुन पुर्ण केले. लॉयला महाविद्यालयातुनच पदार्थ विद्यान शाखेत बी.एस्सी.ची पदवी घेतली. त्यामध्ये ते विद्यापिठातुन ७ वे आले.   त्यानंतर गिंडीच्या महाविद्यालयातुन अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. दरम्यानच्या काळात त्यांच्या वडीलांचा अकस्मित मुत्यू झाला. १९४४ साली वर्गीस कुरीयन यांनी टाटा आर्यन अँण्ड स्टील कंपनी मध्ये पदवीधर म्हणुन नोकरीसाठी रुजु झाले त्यानंतर १९४६ साली त्यांनी जमशेदपूर येथील टाटा स्टील टेक्निकल इन्स्टिटुट मधुन पुन्हा पदवी मिळवली. शिक्षणाबरोबरच टेनिस ,...