दुखाचा सुर्य मावळला...
दुखाचा सुर्य मावळला... दुखाचा सुर्य मावळला... आजचा सुर्य मावळला. मावळता सुर्य आपल्या सोबत अनेक दुख घेऊन गेला. २०१२ हे वर्षच तसं दुखात गेलं. महाराष्ट्रावर तर अनेक संकटाचे पहाड कोसळले. अनेक सुखद घटना कमी आणि दुखाचे सावट घेवुन आलेल्या या २०१२ ने आपल्याला फार काही दिले असे नाही. पण अनेक महाराष्ट्राचे रत्न आपल्यातुन या कुटील डावाने हिरावुन घेतले. सिनेसृष्टीतर दुखाचे सावटच होते. वर्षाच्या सुरवातीलाच कल्पना मोहन, रुबीना शेरगील, मोना कपुर, जॉय मुखर्जी, अचला सचदेव सारख्या जेष्ठ तारकांच्या निधनाने २०१२ सुरु झाले. दिग्दर्शक ओ.पी. दत्ता हे सुद्धा वृद्धापकाळाने गेले. मुंबईचे मा. पोलिस आयुक्त हसन गफुर यांचे हद्यविकाराने निधन झाले. हसन गफुरांच्या निधनांने मुंबई पोलिस हादरले शिस्तप्रिय आणि आपल्या पोलिसांवर प्रेम करणारा अधिकारी इतक्या लवकर जाईल असे कदापि कोणालाच वाटले नव्हते. त्यानंतर सगळे हळहळले ते रसना गर्ल तरुणी सचदेवच्या अपघाती निधनाने याच मे महिन्यात बॉलीवुडचा बॉडीबिल्डर ...